कोल्हापूर – 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदी करण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
सध्या रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंत जमावबंदी असल्यामुळे नागरिकांनी 31 डिसेंबर घरात साजरा करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या राज्यबॉर्डर वर नाकाबंदी सुरू असून गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणारी गोव्याच्या मद्याची तस्करी रोखण्यासाठीही विशेष पथके तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेषत: कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात शहरांतर्गत नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे..