राजगुरूनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता नियम पाळावेत. नियमभंग करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकारांना दिली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1260979230908446/
खेड तालुक्यात करोना विषाणूचा वाढते प्रमाण लक्षात घेता आज राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,आमदार दिलीप मोहिते,खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उप विभागीय अधिकारी संजय तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्यासह चाकण, खेड आळंदीचे पोलीस अधिकारी, तालुक्यातील विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले कि, जिल्ह्यात करोना बाधित मध्ये वाढ होत आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जात त्याचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेले नियम पाळावेत. जिल्ह्यात करोना रोखण्यासाठी कंटेनमेंट झोनचे स्वरूप वाढविण्यात येणार आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील जास्त लोकांचा शोध घेण्यात येणार आहे. संपर्कत आलेल्याना व्यक्तींना कोरंटाईन केले जाणार आहे. स्थानिक अधिकऱ्यानी परिस्थतीत पाहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा. त्यासाठी परवानगी देण्यात येईल.
खेड तालुक्यात सर्व इन्फ्रास्ट्रक्चर व सुविधा आहेत. अडचण नाही. मात्र नियोजन केल्यास करोनावर मात करता येईल. जी काळजी लोकांनी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही म्हणून खेड तालुक्यात आम्ही कडक निर्बंध घालून करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. चूक करणाऱ्यावर आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल लेवल ला आम्ही लॉकडाऊन करणार नाही मात्र स्थानिक समन्व्ययातून लॉकडाऊन करावे. तातडीच्या सेवांना अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. संस्थात्मक विलगीकरण, करोना चाचणी व करोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाच्या कामाशिवाय अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक गतिमान करण्यात येणार आहे. लग्न समारंभात शासनाने घालून दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
आमदार दिलीप मोहिते यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून करोनाचे संकट दूर करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.स्थानिक पातळीवर सर्वानी एकजूट ठेवून शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले तर चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर शहरात वाढती बाधित रुग्णाची संख्या लक्षात घेता सर्वानी स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळावा.
खेड पंचायत समिती कार्यक्षेत्रात प्रांताधिकारी यांनी दिलेल्या नियमावलीला अधीन राहून लोकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. करोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.