नवी दिल्ली : भारत हा विविध परंपरांनी बनलेला देश आहे. देशाच्या काना कोपर्यात असलेल्या प्रदेशांमध्ये अनेक प्रकारच्या रूढी आणि परंपरा आजही कायम दिसतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारची एक परंपरा समोर आली असून ज्यामध्ये मृत व्यक्तींचे विवाह लावले जातात. ज्या व्यक्ती जन्मजात मृत झाल्या होत्या त्या लोकांचे तीस वर्षानंतर विवाह करण्याची ही प्रथा आहे विवाहाची ही प्रथा प्रेतकल्याणम म्हणून ओळखली जाते.
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये आणि केरळच्या काही प्रदेशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रेत कल्याणम विधी केले जातात. ज्या घरांमध्ये अशाप्रकारे जन्मजात एखाद्या मुलाचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर तीस वर्षाने त्या मुलासाठी अशाच प्रकारे जन्मजात मरण पावलेल्या मुलीचा शोध घेतला जातो आणि त्या दोघांचे लग्न ठरवले जाते, त्यासाठी मुलीचे वय मात्र मुलापेक्षा कमी असणे गरजेचे असते. जेव्हा हे लग्न ठरते तेव्हा दोन्ही घरातील लोक एकत्र येतात आणि नेहमीच्या लग्ना प्रमाणे सर्वप्रकारची बोलणी करून विधी पार पाडतात.
जन्मजात मरण पावलेले मुलगा आणि मुलगी आहे जर जिवंत असते आणि त्यांचे लग्न झाले असते तर ज्या प्रकारचे विधी करावे लागले असते असे सर्व विधी केले जातात . प्रेतकल्याणम या विधीमध्ये साखरपुडापासून लग्नापर्यंत सर्व विधी पूर्ण केले जातात. लग्नाचे विधी सुरू असताना वधू आणि वरला बसण्यासाठी दोन खुर्च्याही तिथे ठेवल्या जातात. फक्त वधू आणि वर प्रत्यक्षात उपस्थित नसतात पण सर्व विधी पार केले जातात. प्रेतकल्याणम् हा जो विधी आहे त्याला उपस्थित राहण्याची परवानगी फक्त लग्न झालेला लोकांनाच आहे त्यामुळे लहान मुले आणि अविवाहित लोक या समारंभाला उपस्थित राहू शकत नाहीत.