नवी दिल्ली – दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, बिहारमध्ये प्रदूषण वाढत असून श्वास घेणेही मुश्कील होत आहे. प्रदूषण कमी कसे केले जाईल यावर केंद्र आणि राज्य सरकार विचारमंथन करत आहे. अशातच उत्तरप्रदेशच्या एका मंत्र्याने अजब तर्क मांडले आहे. यावर विविध स्तरांवरून टीका केली जात आहे. तर कवी कुमार विश्वास यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
उत्तरप्रदेशचे मंत्री सुनील भराला यांनी म्हंटले कि, आपल्याला प्रदूषण कमी करायचे असल्यास आधी आपण यज्ञ केले पाहिजे. या यज्ञामुळे इंद्रदेव प्रसन्न होतील आणि पाऊस पडेल. पंजाब आणि हरियाणात राब जाळणे प्राकृतिक प्रक्रिया आहे. यामुळे जास्त नुकसान होत नाही. तसेच प्राकृतिक प्रकियेवर वारंवार टीका करणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे अजब तथ्य त्यांनी मांडले होते.
कुमार विश्वास म्हणाले कि, नोबेल प्राईझवालेही मोठे पक्षपाती आहेत. असे-असे युग वैज्ञानिक सरकार चालवत आहेत आणि त्यांना एकपण नोबेल दिले जात नाही. सर्व देवता इंद्राच्या विश्वासावर आहेत. तर आमच्यासारख्या भारतीयांची काय बिशाद?, अशी टीका त्यांनी सुनील भराला यांच्यावर केली आहे.
ये @NobelPrize वाले भी बडे पक्षपाती हैं ! ऐसे-ऐसे युग-वैज्ञानिक सरकार चला रहे हैं और इन्हें एक नोबेल तक नहीं देती ? जब सारे देवता इंद्र के भरोसे हैं तो फिर हम भारतीयों की क्या बिसात ??? https://t.co/GbHmncvvbf
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) November 3, 2019
दरम्यान, राजधानी परिसरातील हवेचा दर्जा अत्यंत खराब झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. ५ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाब आणि हरियानात शेतात राब जाळण्याचा प्रकार या काळात सुरू होतो.