मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.
राज्यातल्या विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर १० हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. आत्तापर्यंत १३ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे.यानंतर हे चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं होतं.
Today PM Modi ji is taking an ariel survey of #CycloneTauktae affected areas of Daman, Diu and Gujarat.
Why not the same of the areas affected in #Maharashtra ?
Is this not clear cut discrimination ?— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीका केली आहे. तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचं वादळ सुरू झालं आहे. या दौऱ्याविषयी टीका केली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? असा थेट प्रश्न विचारला आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?’