बेल्हे (वार्ताहर): जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सकाळपासून वादळाचा तडाखा बसला आहे.बुधवार (दि.३) दुपारी अडीच वाजल्यापासून वादळा बरोबर जोरदार पाऊस सुरू झाल्याने यात अनेक शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. मंगरुळ (ता.जुन्नर) येथेल पाॅलीहाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक पॉलिहाऊस चा चक्रीवादळाने पेपर फाटले असून गावातील शेतकरी हताश झाले आहेत.
संजय निवृत्ती मनसुख, नवनाथ केशव लामखडे, नामदेव देवजी नवले, सुदाम दगडु चौधरी यांच्या पाॅलीहाऊसचा पेपर फाटून प्रत्येकी २ लाख रुपयांचा नुकसान झालं आहे. अगोदर कोरोनामुळे शेतमालाला बाजार भाव नाही त्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
काळवाडी (ता.जुन्नर) खांबावर वीज कोसळली असून शेजरच्या प्रल्हाद वामन यांच्या घरातील विजेचे सर्व बोर्ड व उपकरणे जळून गेली असून घराचही नुकसान झालं आहे.कल्याण-नगर महामार्गावरील
गुळुंचवाडी येथे रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने दुपारी रस्ता वाहतुकीसाठी दोन ते अडीच तास बंद होता. त्यानंतर तातडीने हे झाड हटूवल असून रस्ता खुला वाहतुकीसाठी खुला केला.
बेल्हे मंचर रस्त्यावर ही झाड कोसळल्याने रस्ता काही काळासाठी बंद झाला होता. बेल्हे येथील मॉडर्न स्कूल च्या पाठीमागे २ झाडे उपटून पडली असून तालुक्याच्या पूर्व भागात अशी अनेक ठिकाणी झाडे वाऱ्याने उपटून पडली आहेत.बऱ्याच ठिकाणी घराचे पत्रे ही उडाले आहेत. शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेचे नुकसान झाले असून अनेक ऊस,कडवळ, मका अशी पिके जमीनदोस्त झालेले आहेत. विजेचे खांब पडल्याने दुपारपासून वीज नव्हती. निमगाव सावा येथील मंचर रोडवर विजेचा खांब कोसळला आहे.
आंब्याच्या झाडाचे तसेच फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे.जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,आमदार अतुल बेनके तसेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून शासनाने त्वरित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या उद्या पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.