मुंबई – काल शेअरबाजारात थोडेफार नफेखोरी झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा आपला मोर्चा खरेदीकडे वळविला आहे. त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक ( stock market news today ) वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा ( bombay stock market news ) निर्देशांक सेन्सेक्स 139 अंकांनी ( sensex today ) वाढून पुन्हा 46 हजाराच्या पुढे म्हणजे 46,099 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या ( national stock exchange ) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ( nse nifty ) 35 अंकांनी वाढून 13,513 अंकांवर बंद झाला.
ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅंक, आयटीसी, टायटन, बजाज ऑटो या कंपन्यांनी आज तेजीचे नेतृत्व केले. तर ऍक्सिस बॅंक, महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स. बजाज फिन्सर्व या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला .
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची होत असलेली गुंतवणूक निर्देशांक उच्च पातळीवर असूनही तेजीचे वातावरण निर्माण करीत आहे. काल शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. असूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,259 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केल्याचे शेअर बाजारांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
रिलायन्स सिक्युरिटी विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले, की जगातील विकसित देशाच्या रिझर्व्ह बॅंकांनी आगामी काळामध्ये व्याजदर कमी पातळीवर ठेवण्याचे संकेत दिले आहेत. विकसित देशात कमी व्याजदरावर भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात आकर्षक वाटत आहेत.
भारतातील कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत भारतीय कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूक होत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे.