मुंबई – शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ पावणे दोन टक्क्यांनी कोसळल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 4.45 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. महागाई वाढून रुपयाचे अवमूल्यन होण्याची शक्यता असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतातून मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काही काळ गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.