मुंबई – देशभरात करोना प्रतिबंधक लसी पोहचविण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्राला अपेक्षित लसींचे डोस मिळाले नसल्याचा पुनरोच्चार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. याआधी देखील त्यांनी लसी कमी दिल्याचा आरोप केंद्र सरकारवर दिल्याचा आरोप केला होता.
महाराष्ट्राला १७.५० लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे १० लाख डोस मिळाले. अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे” असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान केंद्र सरकारने टोपे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींच्या १.६५ कोटी डोसच्या खरेदीची रक्कम राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार पाठवण्यात आली आहे. त्यामुळे लसीच्या डोसच्या वितरणामध्ये केंद्र सरकारने कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केल्याचा प्रश्नच येत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.