मुंबई – राज्यात आज दिवसभरात 3,636 नवीन करोनाबाधित आढळले असून, 5,988 जण करोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर, 37 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.09 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी, तर कधी जास्त आढळून येत आहे.
दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण 63,00,755 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 64,89,800 झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत 137811 करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,49,99,475 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,89,800 (11.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,03,169 व्यक्ती होमक्वारंटाईन, तर 1,963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 47,695 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.