मुंबई – राज्यात सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडी ही सारी दिल्लीत बसलेल्या सरकारची स्क्रीप्ट आहे असा आरोप प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात 11 जुलै पर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याची सूचना केली आहे, त्यावर प्रतिक्रीया विचारली असता पटोले म्हणाले की, आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार जी कारवाई केली जाते त्यानुसार या आमदारांची आमदारकी रद्द होते, पण या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला आहे ते पाहूनच यावर अधिक भाष्य करता येईल.