भोपाल – भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी जोधा आणि अकबर यांच्यात प्रेम नव्हतं. काय होतं? कुठं भेटले होते? कॉफी हाउसमध्ये? जिममध्ये? असे प्रश्नही भाजप आमदाराने उपस्थित केले. त्यांचा या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
रामेश्वर शर्मा एका कार्यक्रमा दरम्यान म्हणाले,’अकबर आणि जोधा यांच्यात प्रेम नव्हतं. त्यांनी फक्त सत्तेसाठी लग्न केले. ते पुढे म्हणाले,’अकबराला आजही महान म्हटलं जातं, पण महाराणा प्रतापच्या त्या वंशजांबद्दल सांगितलं जात नाही जे जीव वाचवण्यासाठी जंगलांमध्ये लपून बसले.’ असेही ते म्हणाले
दरम्यान त्यांचा या विधानामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणाच्या काही भागाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सर्व स्थरातुन त्यांच्यावर टीका होत आहे.