नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये गृह खात्याच्या राज्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या जी किशन रेड्डी यांनी हैद्राबादबाबत केलेल्या एका वक्तव्याने सध्या देशभरामध्ये खळबळ माजली आहे. जी शेखर रेड्डी यांनी हैद्राबादला ‘दहशतवाद्यांचे माहेरघर’ असं संबोधलं असून त्यांच्या या वक्तव्यावर सध्या देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
एआयएमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी नवनिर्वाचित गृह राज्य मंत्री जी किशन यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला असून ते म्हणतात, “जी किशन रेड्डी यांचे हे वक्तव्य त्यांच्या मनात हैद्राबाद आणि तेलंगणाविषयी असलेला द्वेष दर्शवते. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला अशाप्रकारचं विधान करणं शोभत नाही परंतु रेड्डी यांच्याकडून आम्हाला अशाच प्रकारच्या वक्तव्यांची अपेक्षा होती. ही लोकं मुस्लिमांना सदैव दहशवादी म्हणूनच पाहतात.”
यावेळी बोलताना ओवैसी यांनी हैद्रबाबादमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही दंगल झाली नसल्याचा दाखल देत हैद्राबाद हे शहर शांततेच्या मार्गाने प्रगती करीत असल्याचे सांगितले.
Asaduddin Owaisi, AIMIM: Since past 5 yrs there is peace here, there are no communal riots, religious festivals are peacefully celebrated, it is a growing city and he is speaking like that. What enmity do they have with Telangana, Hyderabad? Do they not like that it is growing? https://t.co/s6fveylyVj
— ANI (@ANI) June 1, 2019
A Owaisi, AIMIM on MoS (Home) G Kishan Reddy's reported statement 'Hyderabad safe zone for terror': I'd like to ask him that in last 5 years how many times have NIA, IB & RAW gave in writing that Hyderabad is a safe zone for terror? It is unfortunate the he is saying such things. pic.twitter.com/Y0RYCZYRv2
— ANI (@ANI) June 1, 2019