पुणे – नाशिक येथील निवृत्ती बोऱ्हाडे यांनी 55 ते 65 वर्षे वयोगटातील “वारकरी महावीर’ किताब तर मांडवडारी येथील बळीराम बहिरवाळ यांनी 70 वर्षावरील गटात “ज्येष्ठ वारकरी महावीर’ किताब पटकाविला. नांदेड येथील भास्कर कदम याने 16 ते 25 वर्षे वयोगटातील कुमार वारकरी महावीर सन्मान मिळविला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समितीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने वाखरी येथे घेण्यात आली .या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, अमरावती, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नाशिक, लातूर व कर्नाटक येथील 200 पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला. यावेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, महान भारत केसरी पै. दादू चौगुले, पै. हिंद केसरी पै. दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला.
विविध वयोगटातील विजेते पुढीलप्रमाणे –
16 ते 25 वर्षे-1.भास्कर कदम,2.संतोष नवले,3.भुजंग सवराते.26 ते 35 वर्षे-.1.कैलास बोचरे,2.गोविंद उबाळे,3.केशव साखरे. 36 ते 45 वर्षे-1.तानाजी लांडगे,2.ज्ञानदेव पाटील, 3.नारायण आडकर. 46 ते 55 वर्षे-1.अर्जुन रहाडे,2. किसन नराते, 3.अंकुश भडक. 56 ते 65 वर्षे-.1.निवृत्ती बोऱ्हाडे,2.शिवानंद सागाई, 3.सुभाष गदगे. 70 वर्षावरील-1.बळिराम बहिरवाळ, 2.रावसाहेब खोत, 3.बापू नागरगोजे.