नवी दिल्ली – पीक विमा योजनांच्या संबंधात केंद्र सरकारने राज्य सरकारांचा अभिप्राय मागवला आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी स्वेच्छा योजना करावी काय या विषयावर केंद्राने राज्यांकडून त्यांचे म्हणणे मागवले आहे. सध्या ही विमा योजना शेतकऱ्यांसाठी सक्तीची आहे. या विमा योजनांमधून काहीं लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या संघटनांनी ही योजना सक्तीची करू नये अशी मागणी सरकारकडे केली आहे.
या संबंधात संसदेत माहिती देताना कृषी राज्यमंत्री पुरषोत्तम रूपाला यांनी म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज घेतले आहे त्यांनाच पीक विमा घेण्याची सक्ती करण्यात येते. जे शेतकरी कर्ज घेत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना सक्तीची नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले.