पंढरपूर – लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होत आहेत. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली आहे.
गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.