पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गांवरील ग्रामपंचायतींना राज्य शासनाने 2 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 74 लाख 17 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यासाठी 20 लाख 25 हजार, सोलापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून निधी देण्यात येतो. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींनी मागणी केलेल्या 50 टक्के रक्कम द्यावी आणि उर्वरित 50 टक्के रक्कम ग्रामविकास विभागाने द्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाने हा निधी संबधित जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे.