नवी दिल्ली – जनधन योजनेच्या सुमारे 14 कोटी खातेधारकांवर अनधिकृतपणे फी म्हणून स्टेट बॅंकेने काही रक्कम लागू करून या खातेधारकांकडून तब्बल 254 कोटी रुपये वसूल केले आहेत. जनधन योजनेच्या खातेधारकांना रूपे कार्डावरून काढलेल्या प्रत्येक रकमेवर 17 रुपये 70 पैशांची फी आकारणी स्टेट बॅंकेने केली होती.
ती अनावश्यक होती. हे पैसे संबंधितांना परत देण्याचा आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आला होता. एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2020 या अवधीत स्टेट बॅंकेने ही रक्कम जनधन योजनेच्या खातेधारकांकडून वसूल केली होती.
तथापि, बॅंकेला देण्यात आलेल्या आदेशानुसार बॅंकेने केवळ 90 कोटी रुपये संबंधित खातेधारकांना अदा केले आहेत. यातील 164 कोटी रुपयांची रक्कम अजून संबंधित खातेदारांना परत मिळालेली नाही असे सांगण्यात येते. यात काही तांत्रिक मुद्दे आहेत असे सांगण्यात आले आहे.