मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने प्राधान्यक्रमाने कर्ज पुरवठा करण्याच्या क्षेत्राची संख्या वाढविली आहे. आता स्टार्टअप्ना प्राधान्यक्रमाने कर्जपुरवठा करण्याच्या या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्यक्रमाने कर्ज पुरवठा करण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. देशातील अर्थविषयक परिस्थिती बदलत आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन नव्या क्षेत्रांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
भारत सरकारने देशात स्टार्टअप् वाढावे यासाठी गेल्या काही वर्षापासून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आता ज्या स्टार्टअप्ची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे, अशा स्टार्टअप्ना बॅंकाकडून 50 कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा होऊ शकणार आहे. त्याचबरोबर जे जिल्हे कमी विकसित झाले आहेत अशा जिल्ह्यांमध्ये कर्जपुरवठा वाढवण्याच्या सूचना बॅंकांना दिल्या आहेत.