चिंबळी – तीन मेपर्यंत लॉकडाऊन जाहिर केले असल्याने गोरगरीब भाडेकरूंचे हाल होऊ नये म्हणून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभापती विलास कातोरे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच माजी सरपंच अर्जुन अवघडे, शंकर जैद, प्रगतशील शेतकरी जयसिंग बहिरट, अर्जुन जाधव, माजी उपसरपंच संतोष कातोरे, अमोल बहिरट यांच्या माध्यमातून चिंबळी येथे हनुमान तरूण मंडळाच्या वतीने सोमवार (दि. 27) पासून सकाळी 11 ते 1 पर्यंत मोफत जेवण वाटप सुरू करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ मंडल अधिकारी चेतन चासकर, तलाठी बी. बी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, टीटीबी कंपनीचे मालक मुरलीधर कदम, आदित्य मिस्रा, संतवंत सिंग, माजी उपसरपंच हेमंत जैद, माजी चेअरमन ज्ञानेश्वरी कड, बाळासाहेब बर्गे, बाळासाहेब जाधव आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चेअरमन हिरामण जैद, युवा उद्योजक सत्यवान जैद, दत्तात्रय लोखंडे, हिरामण बहिरट, पंडीत कड, विकास अवघडे आदि मान्यवर उपस्थित होते.