सचिन, सानियासह अनेकांनी व्यक्त केल्या भावना
विशाखापट्टणम – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व टेनिसस्टार सानिया मिर्झा यांच्यासह भारतातील स्टार क्रीडापटूंनी येथील पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी वायुगळतीतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेत जवळपास 12 लोकांचा मृत्यू झाला असून 5 हजारांपेक्षाही जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर सचिन, सानिया, विराट कोहली, शिखर धवन, युवराज सिंग, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या यांनी शोक व्यक्त केला आहे. विषारी वायूच्या गळतीमुळे आता आणखी काही लोकांना त्रास होऊ नये यासाठी कंपनीपासून तीन किलोमीटर पर्यंतच्या अनेक गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.या वायुगळतीमुळे जवळपास दीडशे लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातीलही काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तसेच जे उपचार घेत आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी इश्वराकडे प्रार्थना करत आहोत, अशा शब्दात या खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.