पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी शासन निर्णयानुसार तीन टक्के महागाई भत्ता थकबाकीसह देण्यात यावा, सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट 12 हजार 500 सानुग्रह अनुदान द्यावे, या मुख्य मागण्यांसाठी पुण्यातील विभागीय कार्यालयासह राज्यभरात महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
एस. टी कर्मचाऱ्यांना महामंडळाने दिवाळीनिमित्त केवळ 2,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आमच्या मागण्यांना केराची टोपी दाखवत फसवणूक केली आहे. कर्मचाऱ्यांना शासननिर्णयानुसार तीन टक्के थकबाकीसह महागाई भत्ता, सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन विचारात न घेता सरसकट 1,250 रुपये या कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत.
तसेच करार, कायदा या परिपत्रकाचा भंग करुन प्रसारित केलेली परिपत्रके रद्द करावीत, विविध सेवेचे कंत्राटीकरण व अप्रत्यक्ष होणारे खासगीकरण रद्द करावेत, सुस्थितीतील ई.टी.आय.एम देण्यात यावे या मागण्यांची प्रशासनाने दखल घ्यावी;अन्यथा आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला
आहे.