मुंबई – सहा महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टानं सेवेत रुजू होण्यासाठी शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. मुंबई हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. मुंबई हायकोर्टाने आज (दि. 7) यावर आपला निर्णय दिला आहे.
तसंच सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे लवकरात लवकर पुन्हा कामावर येण्याचा शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कामगार संपावर आहे. त्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहते.