मुंबई -‘कांतारा’ ने आपल्या उत्कृष्ट कथेसह, व्हिज्युअल्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सने दर्शकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाला अधिक यश मिळत आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे. आध्यात्मिक गुरु श्री रवी शंकर यांनी देखील ‘कांतारा’ पाहिल्यानंतर या चित्रपटावर भाष्य केलं आहे.
बंगळुरूच्या आश्रमांमध्ये रवी शंकर आणि त्यांच्या अनुयायांसाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते.चित्रपट पाहिल्यानंतर रवी शंकर यांनी चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाचा संपूर्ण कर्नाटक राज्याला अभिमान आहे.तसेच या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांनी केलेला काम फार प्रभावशाली आहे. कांतारामध्ये मालेनाडूची महानता सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली असल्याचे स्पष्ट मत यावेळी रवी शंकर यांनी व्यक्त केलं.
We thank Guruji @SriSri for the screening of #Kantara. It was our privilege to screen the movie at the @BangaloreAshram. We wish to be rooted in our culture & promise to carry it forward always.@shetty_rishab @VKiragandur @hombalefilms @gowda_sapthami @AJANEESHB @actorkishore pic.twitter.com/wwsUQ7R0D0
— Rishab Shetty (@shetty_rishab) November 1, 2022
रिषभ शेट्टी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.तसेच बंगळूरमध्ये आमचा चित्रपट दाखवला जाण हे आमचं भाग्य असलयाचे शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडियावरून म्हंटले आहे. तसेच गुरुजींनी वेळात वेळ काढून चित्रपट पहिला याबाबद्दल देखील शेट्टी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.