कोलोंबो – श्रीलंकेचे पदच्युत अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात समन्स बजावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. श्रीलंकेत 2011 मध्ये दोन कार्यकर्ते बेपत्ता झाले होते. (Sri Lanka SC orders to issue summons to Gotabaya Rajapaksa in 2011 human rights violation case) त्या संदर्भात मानवीहक्क उल्लंघन प्रकरणी राजपक्षे यांच्याविरोधात हे समन्स बजाबण्यात आले आहे. राजपक्षे हे आता अध्यक्ष नसल्यामुळे त्यांना आता घटनात्नमक संरक्षण राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना समन्स बजावण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ललित वीराराज आणि कुगन मुरुगनाथन हे दोन कार्यकर्ते श्रीलंकेच्या उत्तरेकडील जाफना प्रांतातून बेपत्ता झाले होते. श्रीलंकेत दीर्घकाळ सुरू असलेले यादवी युद्ध समाप्त झाल्यानंतर लगेचच हे दोन कार्यकर्ते बेपत्ता झाले होते. तेंव्हा राजप7े संरक्षण मंत्रालयातील सामर्थ्यसाली अधिकारी होते. त्याचवेळी त्यांचे थोरले बंधू महिंदा राजपक्षे हे देशाचे अध्यक्ष होते.
गोटाबाया राजपक्षे यांनी या कार्यकर्त्यांच्या अपहरण प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, असा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्या कार्यकाळात संशयित बंडखोर, टीका करणारे पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे अपहरण केले जात असायचे. त्यांच्यापैकी कित्येकांना नंतर बघितलेही गेले नाही.
राजपक्षे यांना 2018 मध्येही समन्स बजावण्यात आले होते. मात्र न्यायालयात हजर होण्यासाठी आपण जाफना येथे आल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा बचाव तच्यांनी तेंव्हा केला होता. त्यानंतर राजपक्षे प्रभारी अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना घटनात्मक संरक्षण मिळाले. त्यामुळे त्यांना समन्स बजावले जाऊ शकले नव्हते.