कोलंबो – सूर्यकुमार यादवचे अर्धशतक व कर्णधार शिखऱ धवन, संजू सॅमसन यांच्या उपयुक्त खेळीनंतरही भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात मर्यादित 20 षटकांत 5 गडी गमावून 164 धावाच करता आल्या.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर पृथ्वी शॉ लवकर बाद झाल्यावर कर्णधार धवनने सॅमसनला हाताशी घेत संघाचा डाव सावरला. धवन अर्धशतक मात्र पूर्ण करू शकला नाही. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. धवन बाद झाल्यावर सूर्यकुमारने सॅमसनसह 62 धावा जोडल्या.
सॅमसनही बाद झाल्यावर मात्र सूर्यकुमारने अर्धशतक पूर्ण केले, पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तोदेखील बाद झाला. त्याने 35 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर हार्दिक पंड्या व इशान किशनने भारताच्या धावसंख्येला दीडशतकी मजल मारून दिली. पंड्या याही सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा व दुष्मंता चमिरा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 5 बाद 164 धावा. (सूर्यकुमार यादव 50, शिखर धवन 46, संजू सॅमसन 27, इशान किशन नाबाद 20, कृणाल पंड्या नाबाद 3, वनिंदू हसरंगा 2-28, दुष्मंता चमिरा 2-24).