नवी दिल्ली – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. यानंतर या हल्ल्याचे धागेदोरे भारतापर्यंत पोहचले असून, याप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) केरळमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने कारवाई करत केरळ मधून अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ या संशयित तरूणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी घेत असल्याचे समजते. आयएसआयएस कासारगाव मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आज केरळमधील तीन ठिकाणी छापेमारी केली आहे.
श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये २९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ५०० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले होते.