इंदापूर – पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. शासकीय नियमानुसार शहरी भागातील शाळांचे आठवीपासूनचे वर्ग सोमवार (दि.4) पासून सुरू करण्यात आले. इंदापूर तालुक्यात अनेक शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तालुक्यात पहिल्यादिवशी 28 हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.
इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयात, इंदापूर तालुक्यात विद्यालयातील 50 टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सूचित करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य रामचंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, पर्यवेक्षक विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीधर बाब्रस व विठ्ठल ननवरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले. यावेळी विजय धेंडे, नारायण व्यवहारे, अंकुश फुले, बाबासाहेब साळुंके, प्रकाश पापत, संजय गायकवाड, निळकंठ शिंदे, ग्रंथपाल पुष्पा लोंढे उपस्थित होते.
पहिल्यादिवशी एकूण 157 शाळा सुरू
इंदापूर तालुक्यात 5 वी ते 12 वीच्या एकूण 157 शाळा सुरू केल्या असून, एकत्रित विद्यार्थी संख्या एकूण 52 हजार 839 विद्यार्थी संख्या आहे. एकूण 28 हजार 292 विद्यार्थी शाळेत हजर होते, अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली. श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.