मुंबई – आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही.
अशातच मराठी अभिनेता ‘संकर्षण कऱ्हाडे’ने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता लिहिली आहे. सध्या त्याची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.