नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे भाषण केले. आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही, हे मी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सरकार परिकथेतील गोड गुलाबी गप्पा मारत आहे ,पण प्रत्यक्षात काहीही होत नाही, अशी टीका त्यांनी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, बुलेट ट्रेनच्या या सरकारने गप्पा मारल्या, पण प्रत्यक्षात जमीनही अद्याप अधिग्रहीत झाली नाही.महत्वाचा मुद्दा असा आहे की,उपनगरीय रेल्वेसेवेची एवढी दुरवस्था झाली असताना ती सुधारण्यावर पैसा खर्च करावा की बुलेट ट्रेनसारख्या अवाजवी अवास्तव गोष्टींचा पाठलाग करायचा,हे सरकारनं ठरवलं पाहिजे
मी स्वतः उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या राज्यातून म्हणजेच महाराष्ट्रातून आले आहे. गुंतवणूकीवरील प्रचंड नकारात्मक परिणाम आम्हाला जाणवतो आहे. एवढंच नाही तर शेअर बाजार कोसळतोय. पण सरकार फीलगुड चा माहौल असल्याचा दावा कसं काय करतेय?, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.