मुंबई – काश्मीरमधील कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी नुकतंच राज्यसभेतून निरोप घेतला आहे. यावेळी त्यांच्यासह एकूण चार राज्यसभा सदस्यांना निरोप देण्यात आला. दरम्यान, यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यसभेत झालेल्या कामकाजाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुलामनबी आझाद यांच्यावर बोलताना अश्रु अनावर झाले होते. त्यामुळे सारे सभागृह भावूक झाल्याचे चित्र दिसून आहे.
गुलामनबी आझाद यांनी संसदेत आणि राजकारणात दिलेल्या उत्तम योगदानाचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. ते म्हणाले की त्यांनी आणि मी एकाच वेळी दोन राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना मोदींना अश्रु अनावर झाले. त्यांचा गळा दाटून आला आणि त्यांना पुढे बोलताना बरेच कष्ट पडत होते.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या दुःखद प्रसंगाबद्दल अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. सध्या रितेश देशमुखचे हे ट्विट सोशलवर चांगलेच चर्चेत आले आहे. रितेश म्हणाला कि, “गुलाम नबी आझाद साहेब राज्यसभेतून निवृत्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाने मी प्रभावित झालो आहे’. या आशयाचे ट्विट त्याने केले.