चिंबळी -येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कोळपणी सुरू केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, वाल, चवळी, मूग, उडीद इत्यादी पिकाची जवळपास पाच हजार हेक्टर सोयाबीन पिकाची पेरणी केली.
सोयाबीन पिकात गवताचे तण मोठ्या प्रमाणात उगवले असल्याने शेतकऱ्यांनी खुरपणी ऐवजी कोळपणी सुरू केली आहे. यामुळे या भागातील शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पावसामुळे या परिसरातील पिकांना चांगला फायदा होणार आहे.