तांदूळ लागवडीखालील क्षेत्रात वाढ
नवी दिल्ली : कोविड -19’च्या पार्श्वभूमीवरच्या 21 दिवसांच्या लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या अडचणींनंतरही उन्हाळी पिकांची पेरणी समाधानकारकपणे झाली आहे. लॉकडाउन काळात असलेली बंधने आणि सामाजिक अंतराचे नियम असतानाही तांदूळ, डाळी, भरडधान्य आणि तेल बियाण्यांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.64 टक्के वाढ झाली आहे. सन 2018–19 मध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र 37.12 लाख हेक्टर होते तर 2019 – 20 मध्ये 48.76 लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच आठवड्यात 10 एप्रिल रोजी 41.81 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते.
तांदूळाच्या पेरणी क्षेत्रात 8.77% वाढीचे प्रमाण आहे. नाचणीसारखी भरडधान्य वगळता मागील वर्षीच्या तुलनेत 0.06% किरकोळ घट नोंदली गेली आहे. मुख्यतः पश्चिम बंगालमध्ये (11.25 लाख हेक्टर), तेलंगणात (7.45 लाख हेक्टर), ओडिशात (3.13 लाख हेक्टर), आसाममध्ये (2.73 लाख हेक्टर), कर्नाटकमध्ये (1 64 लाख हेक्टर), छत्तीसगडमध्ये (1.50लाख हेक्टर), तामिळनाडूत (1.30 लाख हेक्टर), बिहारमध्ये (1.22 लाख हेक्टर), महाराष्ट्रात (0.65 लाख हेक्टर), मध्य प्रदेशमध्ये (0.59 लाख हेक्टर), गुजरातमध्ये (0 54 लाख हेक्टर) आणि केरळमध्ये (0.46 लाख हेक्टर) क्षेत्र तांदुळाखाली नोंदविण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 3.97 लाख हेक्टर क्षेत्र डाळींखाली नोंदविण्यात आले आहे. तर भरडधान्यांचे 5..54 लाख हेक्टर क्षेत्रफळ नोंदविण्यात आले. तेलबियांमध्ये मागील वर्षीच्या याच कालावधीत 5.97 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी सुमारे 6..66 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.