मुंबई – करोनाचा नवा अतवार जास्त धोकादायक ठरत असतानाही दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने भारतीय संघाच्या सुरक्षेची हमी दिली आहे. याबाबत आता बीसीसीआय खेळाडूंशी तसेच केंद्र सरकारशी सल्लामसलत करून आपला निर्णय घेणार आहे.
भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण अफ्रिकेतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोनने प्रचंड संकट निर्माण केले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मात्र, भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाइल, त्यांना कोणताही धोका होणार नाही अशी हमी दक्षिण अफ्रिका क्रिकेट मंडळाने दिली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल जाल्यावर लगेचच बायो बबलमध्ये रवाना होइल.
या दौऱ्या भारतीय संघ 3 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी-20 सामने खेळणार आहे. दरम्यान भारताचा अ संघही दक्षिण अफ्रिकेतच मालिका खेळत आहे. या दोन्ही संघांची सुरक्षा सर्वात महत्वाची असून त्यासाठी शक्य ते सर्व उपाय केले जातील, असेही दक्षिण आफ्रिका मंडळाने म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र हा दौरा होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. आता याबाबत सरकार काय निर्णय घेते यावर या दौऱ्याचे भवितव्य अवलंबून आहे.