मुंबई – इंग्लंड – भारत कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे अशातच भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत यास करोना झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान रिषभची तब्येत आता व्यवस्थित आहे. तो जलद वेगाने रिकव्हर होत असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे.
२० दिवसांच्या सुट्टीत रिषभ पंत यूरो चषक फुटबॉल स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी गेला होता अन् तेथे तो मास्क व सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन करताना दिसला नव्हता. त्यामुळेच त्याचा करोना झाल्याचे समोर येत आहे.
सौरव गांगुली माहिती देताना म्हणाली की, आयपीएल स्पर्धा सुरु असताना बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. आता इंग्लंड दौऱ्यातही दोन भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात आणि फॅन्समध्ये चिंतेंचं वातावरण आहे. अशातच रिषभची तब्येत अगदी व्यवस्थेत आहे. त्याच्या तब्येतीची काहीही चिंता करण्याचं कारण नाही. तो वेगाने रिकव्हर होत आहे.
करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या नंतर रिषभ विलगिकरणात गेला होता. आता त्याची तब्बेत स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही.