नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला सोमवारपासून उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. हवामान खात्यानुसार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण असेल. येथील नागरिकांना उष्णतेची लाट आणि कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
3 मेपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये उष्मा कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतात सध्या प्रचंड उष्णता आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात या एप्रिलमध्ये 122 वर्षांचा विक्रम मोडला गेला. येथील सरासरी कमाल तापमान 35.9 अंश सेल्सिअस आणि 37.78 अंश सेल्सिअसवर पोहोचले.
एप्रिल 2010 मध्ये वायव्य भारतात सरासरी तापमान 35.4 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. त्यापूर्वी 1973 मध्ये 37.75 अंशांची नोंद झाली होती. शास्त्रज्ञांनी हवामान बदलाबाबत इशारा दिला असून या प्रदेशातील वाढत्या तापमानाचा एक अब्ज लोकांवर परिणाम होईल असंही म्हटलं आहे.
बरेच लोक तापमान वाढीला उष्णतेची लाट समजतात. परंतु तसे नाही. जेव्हा तापमान अनेक दिवस सामान्यापेक्षा जास्त राहते आणि आर्द्रता देखील वाढते तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात जेव्हा तापमान 40 अंशांच्या वर जाते तेव्हा हवामान खात्याने उष्णतेची लाट जाहीर केली. यंदा उष्मा वाढण्याचे कारण मार्चअखेर तयार झालेले अँटी सायक्लोन असल्याचे सांगितले जात आहे.