“मणिकर्णिका’चे दिग्दर्शन कंगना रणावतने स्वतः पुढाकार घेऊन केले होते. मात्र तिच्या कार्यशैलीवरून अनेक जण नाराज झाले होते. त्यामध्ये एक सोनू सूद देखील होता. तेंव्हा हातातील अन्य सिनेमांकडे लक्ष् द्यायला वेळ मिळ्त नसल्याचे कारण सांगून तो “मणिकर्णिका’तून बाहेर पडला होता.
मात्र आपण हा सिनेमा नक्की का सोडला होता, त्याचे खरे कारण सोनूने आता सांगितले आहे. “मणिकर्णिका’चे दिग्दर्शन क्रिश यांच्याकडे होते. मात्र कंगनाने स्वतःच दिग्दर्शन करायचे ठरवल्यामुळे क्रिश यांना या प्रोजेक्टमधून हटवले गेले होते.
क्रिशना पुन्हा सिनेमासाठी घेण्याबाबतची विनंतीही तिने ऐकली नव्हती. नंतर कामाच्या ओघात आपले जवळ जवळ 80 टक्के सीन कापले गेल्याचे लक्षात आल्यावर सोनूने नाराजी व्यक्त केली होती. कंगना आपली खूप चांगली मैत्रिण असल्याने तिला दुखवायची ईच्छा नव्हती.
पण पूर्वीच्या स्क्रीप्ट आणि दिग्दर्शकाबरोबरच काम करायचे मान्य केले असल्याने आणि कंगनाच्या बदलेल्या प्रभावामुळे आपण नाराजीनेच “मण्कर्णिकामधून बाहेर पडल्याचे सोनूने सांगितले.
या संदर्भात कंगनाने सांगितलेली हकिगत आणखीन वेगळी आहे. सोनूला दिग्दर्शक महिलेच्या हाताखाली काम करायचे नव्हते, म्हणून तो बाहेर पडला, असे कंगना म्हणाली होती.