मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महाअधिवेशन सुरु असून यावेळी नव्या झेंड्याचे अनावर करण्यात आले आहे. यावरून शिवसेनेचे संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. वीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होतं तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटू दे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
काही पक्षांची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, त्यावर त्यांनी काही पक्षांविषयी माहिती नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर, विचारांवर ठाम आहे, असे राऊत म्हणाले. सत्ता येते जाते. पाय जमिनीवर ठेवायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे. जगज्जेते कोणात्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले लोकांना गोळा करुन प्रेरणा दिली आजही शिवसेना त्याच मार्गावरुन पुढे जातेय, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा पंढरपूरच्या वारीसारखा आहे. वारीमध्ये जात, धर्म नसतो, तशीच ही अयोध्येची वारी आहे. त्यामध्ये घटकपक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सहभागी व्हावे. घटकपक्षाचे नेते येणार असतील, तर त्यांना सुद्धा घेऊन जाऊ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.