चित्रपट निर्माता अभिनव कश्यप याने नुकतेच सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करियर बर्बाद केल्याचा गंभीर आरोप केला होता. “दबंग’च्या डायरेक्टरने एका फेसबुक पोस्टमधून अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. याबाबत आता सोहेल खानने ऍक्शन घेतली आहे.
याप्रकरणी सोहेलने अभिनव कश्यपच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. तसेच अरबाज खान याने अभिनवने पोस्ट लिहिण्याच्या अगोदरच त्याच्या विरोधात लीगल ऍक्शन घेतली आहे. यापूर्वी कश्यपने केलेल्या आरोपावर सलीम खान यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर तो म्हणाला होता की, “हो, आम्ही सर्व काही चुकीचे केले आहे, नाही का?” तुम्ही जा आणि आधी त्याचे चित्रपट पहा, मग आम्ही बोलू. त्याला जे करायचे आहे ते करू द्या. तो जे म्हणतो त्यावर माझा वेळ वाया घालवणार नाही.
दरम्यान, अभिनव एका फेसबुक पोस्टमध्ये म्हणाला होता की, सोहेल मला धमकावतो. त्याने वायाकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा यांनाही धमकाविले होते. माझ्या प्रोजेक्टला नुकसान पोहोचवले. मला सात कोटींची फी व्याजासह परत करावी लागली. त्याच्या रिलायन्स एन्टरटेन्मेंटने मला वाचवले आणि आम्ही “बेशरम’ चित्रपटाचे भागीदार बनलो, असे गंभीर आरोप केले होते.