पटना – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे. नोकरी, बेरोजगारी सारख्या अनेक समस्या या काळात निर्माण झाल्या आहे. मात्र बिहारमधील एका प्रियकराला आपली प्रेयसी गमवावी लागली आहे. या प्रियकरानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे लॉकडाऊन काळात लग्नावर निर्बंध आणावेत अशी विनवणी केली होती. जणे करून त्याच्या प्रेयसीचे लग्न थांबविण्यात येणार मात्र नितीश कुमार यांनी या प्रियकराला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तुम्ही एक अपयशी मुख्यमंत्री आहेत. पुन्हा कधी मुख्यमंत्री बनू शकनार नाहीत ? असा शाप दिला आहे.
सर आप एक नकारा मुख्यमंत्री है आप को अपने पद से इस्तीफा देदेनी चाहिए आप से मैंने कितना अपील किया था पिछले 19 मई को मेरी girlfriend की शादी थी रोकवा दीजिए लेकिन आप ने कोई प्रतिक्रिया नही दिया और शिर्फ़ #बेरोजगारी के वजह से वो मेरी नही हो पाई 😭
आप को मेरी हाय लगेनी 😡— Pankaj Kumar Gupta (@Pankajgupta890) May 24, 2021
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट द्वारे माहिती देऊन बिहारमध्ये सोमवारी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या ट्विटला पंकज कुमार गुप्ता नावाच्या प्रियकराने रिप्लाय दिली की, सर, तुमचं अपयश लपवण्यासाठी हे सगळं करू नका. तुम्हाला मी विनवणी केली होती, माझ्या प्रेयसीचं लग्न थांबवा. तुमच्याकडून एवढंही झालं नाही. तुम्हाला स्वत:ला मुख्यमंत्री म्हणताना लाज कशी वाटत नाही. आज माझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झालं परंतु तुम्ही काहीच केले नाही. अशा शब्दात प्रियकर पंकज कुमारने नितीश कुमार यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंकजच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने ”सर, तुम्ही बिनकामी मुख्यमंत्री आहात. तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. १९ मेपासून मी तुम्हाला कित्येक वेळा मागणी केली होती. माझ्या प्रेयसीचं लग्न थांबवा. परंतु तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त बेरोजगारीमुळे माझं लग्न तिच्यासोबत झालं नाही. तुम्हाला माझा शाप लागेल” प्रेयसी सोबत लग्न न झाल्याने पकंजने असा संपात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर व्यक्त केला आहे.