नवीन ओळख होते
मग नंबर exchange होतात
समोरचा खूप जवळचा वाटायला लागतो
मग मेसेजेस चा महापूर येतो
नंतर तो ओसरतो,
कारण एकमेकांच्या भौतिक गोष्टी माहीत झालेल्या असतात
बोलायला फार काही उरत नाही
मग हाय हॅलो च्या नाजूक तारेवर ओळखीची कसरत सुरू होते
Chat list madhye nav तळाला जातं
मग नवीन ओळख होते
नंबर exchange होतात
मेसेज च महापूर येतो
यावेळी फक्त गाव वेगळं असतं पण प्रवास जवळपास तसाच असतो..
गावं बदलत राहिली तरी प्रवास बदलत नाही
चक्र चालूच राहत..
असो..
थांबते..
कोणीतरी “कशी आहेस” असा मेसेज करतय ..
ती व्यक्ती कोण यावरून उत्तर ठरवावं म्हणते..
असच करायचं असतं ना ?
– अनुराधा कदम