मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरूच आहे. भाजप नेत्यांच्या टीकेवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ‘योग्य कोण, माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?’ असा सणसणीत टोला लगावला आहे.
@Dev_Fadnavis जी, आजच मा. @PMOindia यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल.
आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? https://t.co/kpIk2341Tf— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 8, 2021
‘देवेंद्र फडणवीसजी, आजच मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?’ अस म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावला.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देखील थैमान घातले आहे. राज्यात या लाटेत देखील देशातील सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. करोना विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असला तरी राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे येथील परिस्थिती नियंत्रणात येताना दिसतीये. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये फोनवर संभाषण झालं असून त्यात राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले.