मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रंगलेल्या राजकीय नाट्याचा अखेर काल शेवट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचा डाव उलटून लावला आहे.
दरम्यान, या सर्व नाट्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. शहा म्हणाले, “अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता”. असं ते म्हणाले.
भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे.