नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकासआघाडीचे सरकार स्थगितीचे सरकार नसून प्रगतीचे सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते, असे सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, काँग्रेससोबत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला नव्हता. पण दिलेल्या शब्दाचं कौतुक तुम्हाला कधीपासून झालं, असा सवाल विचारत ते पुढे म्हणाले, मोदींनी पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचंं म्हटलं होतं. तुमचं नेत्यांसोबत पटत नाही का, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
उद्धव ठाकरेंनी बिहारच्य़ा राजकारणाचा दाखला देत म्हणाले, चांगला चाललेला संसार मोडण्याचं काम भाजप करतं आणि तसंच त्यांनी लालूप्रसाद आणि नितीशकुमारांची युती भाजपनंच तोडली, असे भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.