नवी दिल्ली – कृषी विधेयकविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी हमीभाव (MSP) होता, आहे आणि राहणार असल्याचा आश्वासन दिले आहे. तसेच चर्चेचे आमंत्रण दिले आहे. यावर भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश टिकैत म्हणाले कि, ते गोंधळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हमीभाव (MSP) संपेल असे म्हंटलेच नाही. आम्हाला केवळ हमीभावावर कायदा हवा आहे. कायदा बनल्याने देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. सध्या हमीभावावर कोणताही कायदा नाही आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे,” असं म्हणत टिकैत यांनी सरकारला उत्तर दिलं आहे.
When did we say that MSP is ending? We said that a law be formed on MSP. If such a law is formed, all the farmers of the country will be benefitted. Right now, there is no law on MSP and the farmers are looted by traders: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/xZDhUzH3nV
— ANI (@ANI) February 8, 2021
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
तसेच, हमीभाव (MSP) होता, आहे आणि राहणार असल्याचा आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. ज्या ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. त्यांनाही दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दुसऱ्या पर्यायांवर विचार केला जात आहे, असे म्हणून मोदी म्हणाले.
तसेच, आंदोलनकर्त्यांना समजावून पुढे जायला हवे. टीका माझ्या खात्यात जाऊ द्या. पण सुधारणा होऊ द्या. वृद्ध नागरिकही आंदोलनाला बसले आहेत, त्यांनी घरी जावे. आंदोलन समाप्त करा आणि चर्चा पुढे चालू ठेवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.