मुंबई – अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी मांडल्यामुळे ही कारवाई केली जात आहे असं वाटतंय का? असा खोचक प्रश्न महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप पक्षाला विचारला आहे.
“ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही”
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’प्रताप सरकानाइक यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पण असे विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे नेते कदाचित काहींच्या डोळ्यात खुपताना दिसत आहेत, म्हणून हा राजकीय सूडाचा प्रकार घडतोय. ईडी हे भाजप सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याचं दिसतंय.”
प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्राला ईडीने घेतले ताब्यात
दरम्यान,शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.