कोल्हापूर – मागील महिन्यात महापुरामुळे नुकसान झाले, त्यावर शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली.
आज येथे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला , त्यावेळी ते बोलत होते, जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा दिला.
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापुरातील दसरा चौकातून काढण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापुरातील दसरा चौकातून काढण्यात आला होता.
राजू शेट्टी 2019 साली मिळालेल्या मदतीचा देखील यावेळी दाखला दिला. सरकार निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.