मुंबई – आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्रातील पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली होती.
Sources: NCP Chief Sharad Pawar was part of discussions for Devendra Fadnavis led Maharashtra Govt formation, he had given his assent to Ajit Pawar pic.twitter.com/1MHKfTgGHR
— ANI (@ANI) November 23, 2019
नुकत्याच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकार स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्चा केली होती या चर्चेस अजित पवार यांनी आपली सहमती दिली. यावेळी सरकार स्थापनेचा फार्मुला ठरविण्यात आला होता. त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, २४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधी दरम्यान दिली.