मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला आहे. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही.
तसेच हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर असा हल्ला खरंच झाला असेल तर निषेधच आहे. पण कालच्या कसब्यातील पराभवाची चर्चा होत असल्याने देवेंद्रजीनी चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी तर हे केलं नाही ना, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांना थोडं खरचटले आहे. त्यांना काहीच होऊ नये. यावेळी लोकांनी त्यांना पळू पण दिलं नाही. असं म्हणत त्यांनी या हल्ल्यामागचे कारण स्पष्ट केले.
हाताला फ्रॅक्चर, डिस्चार्जनंतर संदीप देशपांडे म्हणतात…
दरम्यान, रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले, “आम्ही कुणाला घाबरत नाही… आणि घाबरणार देखील नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे..’ असं संदीप देशपांडे म्हणाले.