नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा राग आवळला आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांशी समर्थन देत आहे. त्यांनी दहशतवाद्यांना आळा घातला नाही तर पाकिस्तानात जाणारे नद्यांचे पाणी थांबविण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. भारत यासंबंधी अभ्यास करत आहे. व पाकिस्तानच्या हिस्सातील पाणी राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये दिले जाईल, असे गडकरींनी म्हंटले आहे.
नितीन गडकरी म्हणाले कि, तीन नद्यांचे अपनी पाकिस्तानात जात आहे. या पाण्याला थांबविण्याची आमची इच्छा नाही. परंतु, भारत आणि पाकिस्तानात झालेला जल सिंधू करार संपुष्टात आला आहे. यामुळे आमच्यावर करार पाळण्याचे बंधन नाही, असे त्यांनी सांगितले.
Union Minister Nitin Gadkari: Pakistan is continuously supporting terrorists. If Pakistan doesn't stops terrorism, we won't have any other option but to stop river water to Pakistan. So India has started internally studying it. That water will go to Haryana, Punjab & Rajasthan pic.twitter.com/C6N63auZKu
— ANI (@ANI) May 9, 2019
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित टप्प्यात राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये मतदान पार पडणार आहे. अशावेळी या राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी गडकरींनी पाकिस्तानचे पाणी तीन राज्यांना देण्याचे वक्तव्य केले असल्याचे चर्चा आहे.